इतरांना सांभाळण्यात, त्यांच्या बरोबर वेळ घालवण्यात आपण इतके गुंग होतो की स्वतःसाठी वेळ काढायला आपल्याला वेळच मिळत नाही. सतत दुसऱ्यांवर प्रेम करण्याच्या नादात स्वतःच्याही प्रेमात पडणं त्याहून अधिक महत्वाचं असतं हे आपण सपशेल विसरलोय. मी परवाच कुठेतरी ऐकलं की स्वतःबरोबर राहण्यात माणूस घाबरतो कारण आपण स्वतः कसे आहोत याची जाणीव सतत होत राहते. इतरांबरोबर असताना आपण स्वतःची त्यांच्यासमोर एक image तयार केलेली असते परंतु एकटं असताना आपण स्वतःलाच स्वतःबद्दल खोटं सांगू शकत
नाही. त्यामुळेच अनेकदा होतं तेवढं याच 'स्वतः' पासून लांब पळण्यासाठी आपण इतरांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो.
सतत कोण तरी आपल्याला हवा असतो आणि इथेच आपलं चुकतं. बाहेर किती गोंधळ आहे तो बघण्याच्या धुंदीत स्वतःच्या डोक्यातील विचार, मनातील भावना केवढा गोंधळ घालत असतात हे पाहायचं अनेकदा आपण जाणूनबुजून टाळतो. पण आपल्याला हेच कळत नाही की एकवेळ बाहेरचा गोंधळ थांबेल पण आतील गोंधळ हा त्याचा बंदोबस्त न केल्याने केवळ वाढतच जाईल, आणि हे जेव्हा मला समजलं ना तेव्हा मी ठरवलं की बाहेरील माणसांना खूश करत राहण्यापेक्षा हा गोंधळ शांत करणं जास्त गरजेचं आहे. स्वतःबरोबर एकांतात वेळ घालवला, स्वतःला जे सगळ्यात जास्त आवडतं त्यात रमून गेलो की आपणच आपल्याला जास्त आवडू लागतो. हळू-हळू विचरांचा गुंता सुटत जातो. लोकांनी लावलेले बोल, 'जुने जाउद्या मरणालागी' या प्रमाणे नाहीसे होत जातात आणि हा हलकल्लोळ थांबून आपण कधी शांत होतो हे समजतच नाही.
इतरांनी आपल्याला वेळ द्यावा, प्रेम करावं, समजून घ्यावं हे असं जेव्हा वाटतं ना तेव्हा एक प्रश्न उद्भवतो आणि तो म्हणजे, "तू स्वतः साठी हे करू शकत नाहीस तर दुसऱ्यांकडून का अपेक्षा ठेवतेस ?". आपण स्वतःवर ज्या दिवशी प्रेम करू शकू त्यानंतरच लोक आपल्यावर प्रेम करू शकतात, कारण जर तुमच्याच नजरेत तुम्ही स्वतःचा तिरस्कार करत असाल तर लोक तरी कसे प्रेम करतील?
जी व्यक्ति आपण मरेपर्यंत साथ देते ती म्हणजे स्वतः आम्हीच. पण याच व्यक्तीसाठी वेळ काढायचा झाला की आपण busy असतो. त्यामुळेच स्वतःला स्वतःसाठी free ठेवणं जास्त महत्वाचं आहे आणि हे ज्याला जमलं त्याला सगळंच जमलं असं म्हणता येतं.
त्यामुळे मला एवढंच म्हणायचय की स्वतः साठी आधी वेळ द्या. स्वतःला स्वतःच्या नजरेत प्रेम दिसू द्या. जर आपणच आपला आदर करत नाही तर लोक तरी काय करतील ?
त्यामुळेच स्वतःला priority बनवा आणि मग दुसऱ्यांसाठी वेळ काढा. कारण स्वतःला विसरून दूसरा मिळत नाही. गरज संपली की प्रत्येक हात सुटत जातो आणि नवीन हात त्याच पद्धतीने जोडले जातात आणि सोडले पण जातात. त्यामुळे इतरांचा हात घट्ट धरून स्वतःलाच इजा करण्यापेक्षा आधी स्वतःचा हात घट्ट धरा आणि स्वतःवर प्रेम करा.

Very nice thought Adu 👌🏻
ReplyDeleteBeautiful aditi
ReplyDeleteAnd absolutely true.
thank you
DeleteReality 🥰 well written
ReplyDeleteविचार आणि मन जितकं सोज्वळ असावं तेवढं कमीच..उत्तम विचार आहेत, अदिती... मनातुन लेखणी पर्यंतचा प्रवास छान रितीने व्यक्त केलेला दिसून येतोय.खूप अश्या वेळीं आपण स्वतः हुन दूर जातो कारण एक म्हणजे आपण स्वतः बदल पाहण्याच्या तयारीत नसतो आणि दुसरं म्हणजे आपण तेच लपवण्या करीता pretentious बनून राहतो जसं ह्या लेखामध्ये आपण व्यक्त केलं.
ReplyDeleteSo keep writing...keep up this thinking and let the ink flow with the colors of thoughts and character in your writing...again wonderful! Need this thinking and understanding self worth.
heyy!!! thank you soo much.. means alott
DeleteYou're most welcome!
DeleteWowwww😍😍😍
ReplyDeleteKhuup chhaan lihilays ga❤️
dhanyawad!
Delete